भारतीय आहाराद्वारे निरोगी आयुष्याचा आणि सुंदर दिसण्याचे रहस्य.....
तुमचा आत्मविश्वास कमी झाला आहे का? चार चौघात जाण्यासाठी तुम्ही टाळाटाळ करता का? Conference, मिटिंग मध्ये बोलताना तुम्हाला पण uncomfortable वाटते का? आपण चारचौघात बोलताना काही चुकीचं बोलू याची भीती वाटते का? आणि हे सर्व का होत असेल असे प्रश्न पडतात का?
सुंदर दिसावं असं प्रत्येकालाच वाटत असतं नाही का? मग हे सुंदर दिसण्याचे खरं रहस्य काय आहे बरं?? फक्त महागड्या कॉस्मेटिक आणि नेहमी पार्लरमध्ये जाऊन चालणार का, तर नाही . तर चला मग आपण जाणून घेऊया असं का होत असेल बरं...
नमस्कार वैवि फुड्स मध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. वैवि म्हणजेच वैशाली आणि विद्या,वैवि फुड्स मध्ये पन्नास प्रकारचे लाडू बनवले जातात. आम्ही हेल्दी फूड प्रॉडक्टवर काम करतो, म्हणजेच काय तर भारतीय पारंपरिक खाद्य संस्कृतीला जोपासण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत असतो.येत्या तीन वर्षात वैविला भारतीय पारंपरिक खाद्यसंस्कृती द्वारे 50 हजार कुटुंबियांना सुदृढ बनवायचे आहे आणि हा वैवि चा ध्यास आहे.
आपल्याला नेहमी असं वाटत असतं की मी सुंदर नाही,मी बांधेसूद नाही, माझा रंग सावळा आहे, व शरीर सुटलेलं आहे. यामुळे आपण प्रत्येक ठिकाणी मागे मागे राहण्याचा प्रयत्न करतो. आणि आपला आत्मविश्वास घालवून बसतो. तुम्हाला माहिती आहे का जर आपल्याला सुंदर दिसायचं असेल तर भारतीय आहार किती महत्त्वाचा आहे?आधी आपण हे लक्षात घ्यायला हवं की सौंदर्याचा मार्ग हृदया पासून सुरू होतो आणि कर्तुत्वापाशी जाऊन थांबतो जर तुम्ही तो मार्ग सुंदर केला तर तुम्ही यशस्वी झालात म्हणून समजा.
सर्वात आधी हे जाणून घेऊया की जर आपला आहार सकस पौष्टिकअसेल तर तो आपल्या शरीराला चांगल्याप्रकारे काम करतो . नियमित तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पिणे व्यायाम करणे तसेच सात्विक आणि पौष्टिक आहार घेणं हे आपल्याला व फायदेशीर ठरतं. सर आपण कशाप्रकारे आपला आहार निवडावा आता थंडीचे दिवस आले आहेत त्यामुळे जास्त भुक लागते, म्हणून आपण कधीही कोणत्याही वेळेत काहीही खाणं, हे चुकीचे ठरू शकते त्यामुळे आपलं वजन वाढले जातं आणि शरीरात जडपणा जाणवतो. तसेच थंडीमध्ये चेहरा काळवंडला जातो चेहरा सुकला ही जातो. यासाठी आपल्याला आपला योग्य तो आहार निवडावा लागणार.
१) तूप :
शारीरिक प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याविना पार पडाव्यात यासाठी शरीर लवचिक असणे आवश्यक आहे यासाठी आपण तुपाचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. नियमित योग्य प्रमाणात खाल्ल्यास आपल्या मेंदूचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते तसेच आपली हाडं सुद्धा बळकट होतात आणि चेहऱ्यावर एक चमक निर्माण होते.
२) मेथी :
मेथी मुळे बऱ्याचशा समस्या कमी होतात. ज्यांना वजन कमी करायचे आहे. तसेच ज्यांचे जास्त पोट सुटलेले आहेत पोटाभोवती अति प्रमाणात चरबी साठलेली असते ती या मेथी मुळे कमी करण्यास मदत होते. केसांच्या समस्या मेथी मुळे कमी होतात. स्त्रियांना कंबर दुखीचा जत्रा असतो तो मेथी मुळे कमी होण्यास मदत होते. थंडीच्या दिवसात मेथी खाणे अति लाभदायक असते. मेथी दाण्यामध्ये बहुमूल्य औषधी गुण आहेत कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीस रुग्णांसाठी हे अमृत समान आहे मेथीदाणे anemia म्हणजेच शरीरात रक्ताची कमतरता असणाऱ्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. तसेच हार्मोन संतुलित राहण्यास मदत करते दररोज तीन ग्रॅम मेथीदाणे महिलांनी खाल्ल्यास कंबरदुखीचा त्रास कमी होतो.
3) अळशी :
४) डिंक :
डिंक हा बाबळीच्या झाडापासून तयार केला जातो. बाभळीच्या झाडातला जो द्रव बाहेर पडतो त्याला सूकून त्याचा डिंक तयार होतो डिंक हे आपल्या सांध्यांना वंगण घालायचे काम करते डिंकाचे सेवन केल्याने शरीरातील थकवा नाहीसा होतो त्याचप्रमाणे गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना आवश्यक असणारी पोषक तत्व अंकामध्ये असतात. डिंक मध्य-पूर्व गुजरात महाराष्ट्र राजस्थान आणि पंजाब मधील काही भागात आढळतो आजारी व्यक्तींना किंवा अशक्तपणा आलेल्या व्यक्तींना डिंक फायदेशीर ठरतो.
तर मग मित्रांनो अशा प्रकारे आपण आपला भारतीय आहार जर योग्य स्वरूपात घेतला तर नक्कीच आपण शरीराने तंदुरुस्त राहू तेव्हा त्याची चमक आपल्या चेहऱ्यावर आपसुकच येते आणि आपल्याला सुंदर दिसण्यात मदत होते. आणि आपण जेव्हा सुंदर दिसतो त्यामुळे आपला आत्मविश्वास ही वाढतो आणि आपण नेहमी तजेलदार राहतो.
हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा तुम्हाला जर अजून आमच्याकडून काही अपेक्षा असतील किंवा तुम्हाला काही आम्हाला सुचवायचं असेल तर नक्कीच काही सूचना आम्हाला कमेंट्स मध्ये तुम्ही सांगू शकता. धन्यवाद.🙏🏻🙏🏻
जर ब्लॉग आपणास आवडला असेल तर खाली दिलेल्या लींक वर क्लिक करा आमच्या सुदृढ भारत या मिशनमध्ये सहभागी व्हा.
https://www.facebook.com/vaivi.foods
https://www.instagram.com/vaivifoods/
https://www.youtube.com/channel/UCypYILqZjcrV4PMDAOSiJeQ
Photo Courtesy: Google images🙏🏻🙏🏻